बुधवार, २२ जुलै, २०१५

tsunami

डळमळले भुमंजल डचमळले सिंधुजल 
चतुष्पाद त्रुणचर ते झाले विचलित 
द्विपाद विचारवंत ते करिति खंत.   
जलाशयाचि लाट अकस्मिक येता प्रलयंकर 
कोसळता घरं,त्याखालि तडफडति मानव 
प्राण्यांना मात्र कुणि सांगितले कानि 
जिव वांचा डोंगरि जाउनि कोपलि आहे धरणि 
कुणास ठाउक काय नक्कि झाले ते  
पहिलि भेग का तुला पडलि घरणिमाते  
सागरतळातच भेग होउनि पाणि गेले खालि  
लाव्हाच्या त्या तप्त रसाचि झालि लाहि लाहि  
गेले त्याच्या शतपट वेगे उसळुनि आले पाणि 
म्हणतां म्हणता  आक्रमलि पाण्याने अवघि धरणि  
झाले गेले होउन् गेले करा अता मलमपट्टि  
अनाथ, दु:खि, ह्यांनि भरलि अवघि किनारपट्टि.  
आजवरि अनेक वेळा जगि या घडला उत्पात      
तरिहि जिवन चालत आले ,तसेच अखंडित   
धांवुन आले दग सारे घेउनि मदतिचा हात 
फिनिक्स पक्ष्यातरि राखेतुनहि उढेल मानवजात